महाराष्ट्र ग्रामीण

आर्णी शहरासह तालुक्यातील लाभार्थी रास्त धान्यापासून वंचित ?

वाटप न करण्यात आलेले धान्य संबंधितांकडे जमा आहे कि नाही, याची चौकशी होणे गरजेचे.

जाकिर हुसैन

आर्णी : आर्णी शहरासह तालुक्यात रेशनच्या धान्याचा सर्वत्र काळा बाजार सुरु असून. खास करुन तांदळाची तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे रास्त धान्य दुकानदार काही शिधापत्रिका धारकांना धान्याचे वाटप करीत नसल्याचे लाभार्थ्याकडून बोलल्या जात आहे माल ९० ℅ च आला आहे बाकीच्या लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात धान्य मिळेल असे दुकानदार म्हणत आहे खरंच धान्य ९०℅ च येत आहे की उरलेले धान्य काळ्या बाजारात विकल्या गेला? १० टक्के शिधापत्रिका धारकांना रास्त धान्याचे वाटप का करण्यात येत नाही ? याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी येथील जनता करीत आहे.
शिधापत्रिका धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मधिल तरतुदीनुसार रास्त धान्याचे वाटप करण्यात येत असते. मात्र मागील काही महिण्यापासुन शहरासह तालुक्यातील अनेक रास्त धान्य दुकानातुन १०० टक्के लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात येत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. धान्य पुरवठा होवुन सुध्दा १०० टक्के धान्याचे वाटप का होत नाही ? आणि ९० टक्के लाभार्थ्यांना वजनातही एक ते दोन किलो राशन कमी देण्यात येत असल्याचे येथील नागरीकांनी आत्ताच एक्सप्रेसला बोलताना सांगितले. विशेष म्हणजे गरीब लाभार्थ्यांकडून आनंदाचा शिधावर सुद्धा दहा ते वीस रुपये ज्यादा घेतल्या जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button